बातम्या

बांगलादेशातून सुमारे हजार भारतीय विद्यार्थी परतले, अजूनही 4000पेक्षा जास्त जण बांगलादेशातच.

About 1 000 Indian students returned from Bangladesh


By nisha patil - 7/20/2024 9:57:51 PM
Share This News:



आरक्षणाच्या विरोधातील संतापामुळं बांगलादेशात विविध भागांत हिंसाचार उसळल्याचं चित्र आहे. या पार्श्वभूमीवर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं त्याठिकाणी राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी काही सूचना प्रसिद्ध केल्या आहेत.

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी परराष्ट्र मंत्रालय, बांगलादेशची राजधानी ढाका येथील भारतीय भारतीय उच्चायुक्तालय आणि चितगाव, राजशाही, सिल्हेत आणि खुलना येथील सहायक उच्चायुक्त कार्यालयाने भारतीय कार्यरत असल्याचं सांगितलं आहे.

या प्रसिद्धी पत्रकामध्ये दिलेल्या माहितीनुसार 20 जुलैपर्यंत सुमारे 778 विद्यार्थ्यांना रस्तामार्गाने भारतात आणलं गेलं असून सुमारे 200 विद्यार्थ्यांना ढाका आणि चितगाव येथील विमानतळांहून भारतात आणण्यात आलं आहे. भारतीय उच्चायुक्त कार्यालय अजूनही बांगलादेशातील विविध विद्यापीठांमध्ये असलेल्या 4000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांच्या संपर्कात असून त्यांना योग्य ती मदत केली जात असल्याचं या प्रसिद्धीपत्रकात सांगितलं आहे.

भारतीय नागरिक आणि विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी उच्चायुक्त आणि सहाय्यक उच्चायुक्त बांगलादेश अधिकाऱ्यांच्या नियमित संपर्कात आहेत. निवडक लँड पोर्ट्सद्वारे विद्यार्थ्यांना भारतात आणण्यासाठी विशेष सुरक्षा कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.                                                                                                                                                   बांग्लाच्या माहितीनुसार, आतापर्यंत या दंगलीत 35 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. पण बहुतांश भागांमध्ये संदेशवहन आणि दळणवळणाचे मार्ग पूर्णपणे ठप्प झाल्यामुळे मृतांचा नेमका आकडा सांगता येणं कठीण आहे.त्याशिवाय शेकडो नागरिक जखमी झाले आहेत. आंदोलन आणि हिंसाचारात सातत्यानं वाढ होत असल्याचं पाहायला मिळतं आहे. आंदोलक आणि पोलिसांमध्ये अनेक ठिकाणी संघर्षही झाल्याचं दिसून आलं.

या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर देशात अनेक भागांमध्ये इंटरनेट सेवा स्थगित करण्यात आली आहे.सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षण रद्द करण्याची मागणी आंदोलकांकडून करण्यात येत आहे.


बांगलादेशातून सुमारे हजार भारतीय विद्यार्थी परतले, अजूनही 4000पेक्षा जास्त जण बांगलादेशातच.