बातम्या

विवेकानंद कॉलेजमध्ये महाराष्ट्र दिन साजरा

Celebration of Maharashtra Day in Vivekananda College


By nisha patil - 1/5/2024 3:58:41 PM
Share This News:



महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेसाठी  अनेकांनी बलिदान दिले. त्यामुळे  स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली.  स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची स्थापना होणेसाठी कोल्हापूर मधून जनआंदोलन उभे राहिले. या निमित्त्‍ उभारण्यात आलेल्या महिला  आंदोलनात संस्थामाता श्रीमती सुशीलादेवी साळुंखे यांचाही महत्वाचा सहभाग होता.  महाराष्ट्राला संतांची, शाहिरांची, सामाजिक व शैक्षणिक सुधारकांची मोठी परंपरा आहे. त्यामुळेच विविधतेमधील एकता महाराष्ट्र राज्यात देशाच्या एकात्मतेसाठी टिकून राहिलेली आहे.  त्यामुळे आज महाराष्ट्राची कला, क्रीडा, उद्योग, शैक्षणिक अशा सर्व क्षेत्रात प्रगती होत आहे.  आजच्या युवकांनी राज्य  ऐक्याच्या भावनेतून देशाला प्रगतीपथाकडे न्यावे.  असे विचार  श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष मा. प्राचार्य  अभयकुमार साळुंखे यांनी ध्वजारोहण समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना मांडले. 

            विवेकानंद कॉलेजमध्ये संस्था कार्याध्यक्ष मा. प्राचार्य  अभयकुमार साळुंखे यांच्या हस्ते महाराष्ट्र दिना निमित्त ध्वजारोहण करणेत आले. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सेक्रेटरी मा.प्राचार्या सौ. शुभांगी गावडे व संस्थेचे सी.ई.ओ. मा.कौस्तुभ गावडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी एन.सी.सी.च्या विद्यार्थ्यांनी भारतीय ध्वजास मानवंदना दिली.

यावेळी संस्था परिसरातील डॉ.बापूजी साळुंखे इंजिनिअरींग कॉलेज, डॉ.बापूजी साळुंखे हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिटयूट, सावित्रीबाई फुले नर्सिंग कॉलेज, न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल,  व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थी , संस्था कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.

            कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहण आणि महाराष्ट्राचे राज्य गीत गर्जा महाराष्ट्र माझा या गीताने झाली.  विवेकानंद कॉलेजचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे संयोजन जिमखाना प्रमुख प्रा.किरण पाटील, लेफ्टनंट जे.आर.भरमगोंडा, प्रा.श्रीमती सहिदा कच्छी, प्रा संतोष कुंडले, प्रा.समीर पठाण, कॅप्टन सुनिता भोसले, रजिस्ट्रार श्री. आर.बी. जोग, प्रशासकीय कर्मचारी यांनी केले.


विवेकानंद कॉलेजमध्ये महाराष्ट्र दिन साजरा