बातम्या

चक्काजाम आंदोलन नऊ तासानंतर मागे ;स्वाभिमानीच्या लढ्याला यश

Chakkajam movement back after nine hours


By nisha patil - 11/23/2023 7:57:15 PM
Share This News:



गेल्या हंगामात तुटलेल्या उसाला ज्या कारखान्यांनी 3000 पेक्षा कमी रक्कम दिली आहे त्यांनी किमान त्यांना शंभर रुपये व ज्यांनी 3000 रुपये दिले आहेत त्यांनी किमान आणखी 50 रुपये देण्यास कोल्हापूर जिल्ह्यातील कारखान्यांनी संमती दिल्याने ऊस हंगामाची कोंडी गुरुवारी रात्री सात वाजता फुटली त्यानंतर स्वाभिमानीने सकाळपासून सुरू असलेले पुणे बेंगलोर महामार्गावरील चक्काजाम आंदोलन नऊ तासानंतर मागे घेतले जिल्हा प्रशासन आणि संघटनेच्या प्रतिनिधींमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात त्या संदर्भात चर्चा झाली मागील हंगामातील 400 रुपयांनी चालू हंगामातील उसाला 3500 रुपये एक रकमी पहिला हप्ता या मागणीसाठी संघटनेने गेले 22 दिवस अत्यंत आक्रमक आंदोलन सुरू असल्याने साखर हंगाम ठप्प झाला आहे ऊस जरा संदर्भात मुंबईत बुधवारी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या दालनात झालेल्या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही त्यानंतर 400 चा आग्रह सोडून देऊन संघटनेने तनास किमान शंभर रुपये घेतल्याशिवाय आंदोलनातून माघार नाही अशी भूमिका घेतली आणि तीन पावले मागे घेतले एवढी रक्कम देण्याची कारखान्याची तयारी आहे ती त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीवेळी दर्शवली होती परंतु सत्ताधारी काही नेते मागील हंगामातील काय द्यायचे नाही चालू हंगामातील पुढचे पुढे बघू अशी भूमिका घेत होते त्यामुळे कारखानदार दपकून होते परंतु आता त्यांनी शंभर रुपये देऊन कोंडी फोडली आहे


चक्काजाम आंदोलन नऊ तासानंतर मागे ;स्वाभिमानीच्या लढ्याला यश