बातम्या

वळीव पावसावेळी नागरिकांनी सावधगिरी बाळगावी -राजे समरजितसिंह घाटगे

Citizens should be careful during imminent rain Raje Samarjit Singh Ghatge


By nisha patil - 5/17/2024 4:37:22 PM
Share This News:



वळीव पावसावेळी नागरिकांनी  सावधगिरी बाळगावी

राजे समरजितसिंह घाटगे

आपदग्रस्त कुंभार कुटूंबियांची घेतली भेट

कागल,प्रतिनिधी.  मान्सूनपुर्व वळीव पावसावेळी वीज कोसळण्याची शक्यता असते. यावेळी नागरिकांनी  सावधगिरी बाळगावी.असे आवाहन शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी केले.

  लिंगनूर दूमाला (ता.कागल)येथील वीज कोसळल्याने जखमी झालेल्या कुंभार कुटूंबियांची त्यांनी भेट घेतली.व त्यांची आस्थेवाईकपणे चौकशी करुन त्यांना आधार दिला.यावेळी ते बोलत होते.

चार दिवसांपुर्वी वळीव पावसात विटा भिजू नयेत. म्हणून त्यावर कागद बांधत असताना काही अंतरावर वीज कोसळून हे सहाजण जखमी झाले होते.त्यामध्ये वीट भट्टीमालक सतीश कुंभार यांच्या कुंटूंबातील चौघांसह अन्य दोघांचा समावेश होता. 
श्री.घाटगे पुढे म्हणाले,मान्सूनपुर्व वळीव पावसावेळी वीज कोसळण्याची शक्यता असते. यावेळी नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी.स्वतःसह पशुधनही सांभाळावे.

 यावेळी सतीश कुंभार,छाया कुंभार,साधना कुंभार,दिपक शितोळे,रंगराव कुंभार,आनंदा व्हन्नूरे, शहाजी पाटील,भिमराव मगदूम, मंगेश पाटील, आनंदा तोडकर,भुपाल कांबळे,सतीश माने, योगेश तोडकर आदी उपस्थित होते.


वळीव पावसावेळी नागरिकांनी सावधगिरी बाळगावी -राजे समरजितसिंह घाटगे