विशेष बातम्या

थेट कर्ज योजनेची मर्यादा २५ हजारांवरून १ लाख रुपये – लाभार्थ्यांनी संधीचा लाभ घ्यावा!

Direct loan scheme limit increased from Rs 25 000 to Rs 1 lakh


By nisha patil - 3/17/2025 4:58:03 PM
Share This News:



थेट कर्ज योजनेची मर्यादा २५ हजारांवरून १ लाख रुपये – लाभार्थ्यांनी संधीचा लाभ घ्यावा!

कोल्हापूर, दि. १७ (जिमाका): साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळामार्फत मातंग समाज व तत्सम १२ पोटजातीतील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना स्वंयरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी थेट कर्ज योजनेची मर्यादा २५ हजारांवरून १ लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. शासनाने या सुधारणेस मान्यता दिली असून, लाभार्थ्यांनी अधिकाधिक प्रमाणात योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक आर.एच. चव्हाण यांनी केले आहे.

योजनेचा निधीवाटप आणि प्रकल्प मर्यादा:

  • प्रकल्प मर्यादा: १ लाख रुपये
  • महामंडळाचा हिस्सा: ८५ हजार रुपये (८५%)
  • अनुदान: १० हजार रुपये (१०%)
  • लाभार्थ्याचा सहभाग: ५ हजार रुपये (५%)
  • कर्ज परतफेड कालावधी: ३६ महिने (३ वर्षे)
  • व्याज दर: ४%

योजनेच्या महत्त्वाच्या बाबी:

लघु उद्योगासाठी प्रकल्प मंजूर
पुरुष आणि महिलांसाठी समान ५०% आरक्षण
ग्रामीण भागातील अर्जदारांना प्राधान्य
राज्यस्तरीय क्रीडा पुरस्कार प्राप्त व्यक्तींना विशेष संधी
सैन्यदलातील वीरगती प्राप्त जवानांच्या कुटुंबातील एका सदस्याला प्राधान्य

पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे:

🔹 अर्जदार मातंग समाज व तत्सम १२ पोटजातींपैकी असावा
🔹 महाराष्ट्रातील रहिवासी आणि १८ ते ५० वयोगटातील असावा
🔹 वार्षिक उत्पन्न ३ लाखांपेक्षा कमी असावे
🔹 यापूर्वी महामंडळाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा
🔹 Cibil Credit Score ५०० पेक्षा जास्त असावा
🔹 आवश्यक कागदपत्रे: जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, आधारकार्ड, रेशनकार्ड, शाळा सोडल्याचा दाखला, व्यवसाय प्रशिक्षण प्रमाणपत्र, व्यवसाय जागेचा पुरावा, पॅनकार्ड, दोन पासपोर्ट फोटो इत्यादी.

कर्ज प्रक्रिया आणि अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख:

  • अर्ज वितरण: १८ ते ३१ मार्च २०२५
  • अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख: ३१ मार्च २०२५
  • अर्जदाराने महामंडळाच्या जिल्हा कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, ताराराणी पुतळा, कावळा नाका, कोल्हापूर येथे प्रत्यक्ष उपस्थित राहणे आवश्यक आहे.
  • त्रयस्थ व्यक्तींमार्फत अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

लाभार्थी निवड प्रक्रिया:

  • कर्जासाठी आलेल्या अर्जांची लॉटरी पद्धतीने निवड केली जाईल.
  • कर्ज मंजुरीसाठी दोन सक्षम जामीनदार अनिवार्य असतील.
  • कर्ज परतफेडीसाठी २० उत्तर दिनांकित धनादेश जमा करावे लागतील.

 स्वंयरोजगाराच्या संधी शोधणाऱ्या तरुणांसाठी ही योजना मोठी संधी ठरणार आहे. इच्छुकांनी वेळेत अर्ज दाखल करून या संधीचा लाभ घ्यावा! 


थेट कर्ज योजनेची मर्यादा २५ हजारांवरून १ लाख रुपये – लाभार्थ्यांनी संधीचा लाभ घ्यावा!
Total Views: 36