बातम्या

4-5 ऑक्टोबरला औरंगाबादसह उस्मानाबादच्या नामांतरावर होणार अंतिम सुनावणी

Final hearing on renaming Aurangabad along with Osmanabad will be held on October 4 5


By nisha patil - 8/31/2023 5:55:56 PM
Share This News:



माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद जिल्ह्याचे नाव संभाजीनगर आणि उस्मानाबाद जिल्ह्याचे धाराशिव करण्याचा मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेतला होता. त्यानंतर राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आले. त्यांनी ठाकरेंचा निर्णय रद्द करून औरंगाबाद जिल्ह्याचे छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबाद जिल्ह्याचे धाराशिव करण्याचा पुन्हा नवीन निर्णय घेतला. हा प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यात आला . तेव्हा  केंद्राने देखील नामांतराला परवानगी दिली होती. मात्र, याच निर्णयाला विरोध झाला आणि  शासनाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या. आता या याचिकेवर 4 ऑक्टोबरला आणि  5 ऑक्टोबरला अंतिम सुनावणी होणार असून,यावर काय निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


4-5 ऑक्टोबरला औरंगाबादसह उस्मानाबादच्या नामांतरावर होणार अंतिम सुनावणी