बातम्या

अखेर जयंत पाटलांनी सोडलं मौन

Finally Jayant Patal broke his silence


By nisha patil - 6/14/2024 8:12:14 PM
Share This News:



 लोकसभा निवडणुकीच्या घोषणेपासूनच सांगली मतदारसंघ मोठा चर्चेत होता. सांगलीवरुन  महाविकास आघाडीमधली धुसफुस समोर आली होती. ठाकरेंनी चर्चा सुरू असतानाही परस्पर सांगलीच्या जागेवर उमेदवाराची घोषणा केली. त्यावरुन काँग्रेस आणि ठाकरे गटात मिठाचा खडा पडल्याचं पाहायला मिळालं होतं. पण याच सांगलीचा तिढा वाढण्यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांच्या नावाची चर्चा होती. सांगलीतील तिढा वाढवण्यासाठी जयंत पाटील कारणीभूत असल्याच्या चर्चा सुरू होत्या. आता याच चर्चांवर खुद्द जयंत पाटलांनी स्पष्टीकरण दिलं आहे.शरद पवार यांच्या प्रभावामुळे गेम पलटला आणि लोकसभेत राष्ट्रवादीला चांगले यश मिळालं. सांगली लोकसभेत काही गोष्टींवरून माझ्याबाबत समज-गैरसमज पसरत गेले. पण, सांगलीत आम्ही आघाडीचा धर्म पाळला. वेगळी कृती केली असती, तर काँग्रेस-शिवसेना दुखावली गेली असती."


अखेर जयंत पाटलांनी सोडलं मौन