बातम्या

विकसित भारत संकल्प यात्रेत लाखोंचा चुराडा...: कार्यक्रमाला रिकाम्या खुर्चा

Lakhs crushed in Deveshkar Bharat Sankalp Yatra


By nisha patil - 12/18/2023 11:07:27 PM
Share This News:



कोल्हापूर -गेल्या २० दिवसांपासून कोल्हापूर  जिल्हा परिषदेपासून ते ग्रामपंचायतीपर्यंत सर्वांच्या प्रयत्नातून ‘विकसित भारत संकल्प यात्रे’ची तयारी करण्यात येत होती. परंतु ऐनवेळी राज्यपाल रमेश बैस आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कार्यक्रमाला अनुपस्थिती दर्शवल्याने नागरिकांनीही कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्याचे चित्र समोर आले आहे. 

यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांच्या उपस्थित कार्यक्रम पार पडला. यावेळी  व्यासपीठासमोरील खुर्चा रिकाम्या असल्याचे निदर्शनास आल्याने  लाखो  रुपये खर्चून उभारलेल्या  कार्यक्रमाचा चुराडा झाल्याची चर्चा रंगली होती. कार्यक्रमाला प्रशासकीय अधिकारी आणि पोलिसांनीच  गर्दी केली होती तर शासकीय योजनांची माहिती देण्यासाठी उभारलेले स्टॉल्सही रिकामे असल्याचे समोर आले आहे.


विकसित भारत संकल्प यात्रेत लाखोंचा चुराडा...: कार्यक्रमाला रिकाम्या खुर्चा