विशेष बातम्या

हुकूमशाहीला महाराष्ट्र जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, जयंत पाटील

Maharashtra will not give way to authoritarianism Jayant Patil


By nisha patil - 6/27/2023 4:52:40 PM
Share This News:



तारा न्युज वेब टीम :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी जळगाव येथे येणार आहेत. त्या सभेसाठी गर्दी जमावी म्हणून थेट जिल्हाधिकाऱ्यांकडून नागरिकांना रेशनपाणी बंद केले जाईल असे धमकावण्यात येत आहेत. ‘जर मुख्यमंत्र्यांच्या सभेला जे हजर राहणार नाहीत त्यांचे रेशनकार्ड रद्द करून तीन चार महिने त्यांचे धान्य बंद करण्यात येईल, तसा सरकारचा नियमच आहे’, असे संदेश रेशनदुकानदारांकडून रेशनकार्डधारकांना पाठवण्यात येत आहेत. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मिंधे सरकारला फटकारले आहे.

”’शासन आपल्या दारी’ या मोहिमेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जळगावात असणार आहेत. या कार्यक्रमासाठी अधिकाधिक गर्दी जमवावी या हेतूने शासकीय यंत्रणांचा दुरुपयोग केला जात आहे. रेशनकार्डधारकांनी सभेला उपस्थित राहणे आवश्यक आहे. अन्यथा त्यांचे रेशन कार्ड रद्द करून पुढील चार महिने धान्य पुरवले जाणार नाही असा धमकी वजा संदेश पसरवण्यात येत आहे. मुख्यमंत्री महोदय हे काय सुरू आहे? महाराष्ट्राने अशी हुकूमशाही कधीच पाहिली नाही. अशा हुकूमशाहीला महाराष्ट्र जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही”, अशी टीका जयंत पाटील यांनी मिंधे सरकारवर केली आहे.


हुकूमशाहीला महाराष्ट्र जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, जयंत पाटील