बातम्या

नवीन वर्षात करा हा एक संकल्प, सर्व आजारांपासून राहाल लांब

Make this a resolution in the new year


By nisha patil - 1/1/2024 8:17:15 AM
Share This News:




नवीन वर्ष सुरु होण्यासाठी काही दिवस उरले आहेत. १ जानेवारीला नव्या वर्षाची सुरुवात होणार आहे. नवीन वर्षात अनेक जण नवे संकल्प करतात. हे संकल्प पूर्ण झाले तर त्याचा आनंद वेगळाच असतो.

त्यामुळे प्रत्येकाने नवीन वर्षात काहीतरी संकल्प केला पाहिजे. अनेक जणांना वर्षातून अनेक वेळा रुग्णालयात जावे लागते. पण जर तुम्ही या वर्षात आजारीच पडणार नाही असा संकल्प करत असाल तर ही बातमी तुमच्यालाठी आहे. कारण या वर्षात कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत ज्यामुळे तुम्हाला ड़ॉक्टरकडे जाण्याची वेळच येणार नाही. आपला आहार आणि आपली जीवनशैली यावर आपलं आरोग्य अवलंबून असतं.

नवीन वर्षात तुम्ही मोबाईलचा अतिवापर टाळण्याचा संकल्प करा. कारण मोबाईलने आपल्या आयुष्यात इतके मोठे घर केले आहे की त्याच्यापासून आपण राहूच शकत नाही. ज्यामुळे आपण इतर वेळेत देखील मोबाईलवर काहीना काही करण्यात गुंतलेले असतो. लहान मुले देखील मोबाईलच्या अतिवापरामुळे आजारी पडू लागले आहेत. रील बघण्यात तासनतास निघून जातात. यामुळे इतर कामांसाठी आपल्याला वेळच मिळत नाही. मोबाईलमध्ये व्यस्त असल्याने लोकं नाती देखील विसरले आहेत. अशा परिस्थितीत २०२४ या नवीन वर्षात आपण हा संकल्प केला पाहिजे.

पोश्चरची समस्या

जी लोकं मोबाईलवर तासनतास बोलतात, तासनतास गेम खेळतात किंवा सोशल मीडियावर वेळ घालवता. त्यांना शरीराच्या पोश्चरची समस्या येते. अशा लोकांना हात आणि खांदेदुखीची समस्या उद्भवते. मोबाईलच्या वापरामुळे अस्वस्थता निर्माण होते.

नैराश्य येणे

अनेक संशोधनात असे समोर आले आहे की, जे लोक स्मार्टफोनचा जास्त वापर करतात त्यांना चिंता आणि नैराश्याची समस्या जास्त असते. कारण तो इतका मोबाईलमध्ये गुंतलेला असतो की त्याला इतरांकडे व्यक्त व्हायला ही वेळ नसतो.

जास्त राग येणे

जी लोकं स्मार्टफोनचा अतिवापर करतात त्या लोकांचा स्वभाव चिडचिडा होत जातो. त्यांना लहान लहान गोष्टीत ही चिड येते. यामुळे नातेसंबंधावर देखील त्याचा परिणाम होतो. त्यामुळे उच्च रक्तदाबाची समस्या देखील उद्भवू शकते.

मुलांच्या मेंदूवर परिणाम

जी मुले लहान वयापासून मोबाइल पाहतात, त्यांच्या मेंदूच्या विकासावरही त्याचा परिणाम होतो. मोबाईल वापरणारी मुले आळशी, चिडचिडी आणि कमी शारीरिक क्रियाशील असतात. त्यांच्या मनावर देखील याचा परिणाम होतो.

फोकस न होणे

जी लोकं मोबाईलचा जास्त वापर करतात ते कोणत्याही कामावर लक्ष केंद्रित करू शकत नाहीत. फोनवर पुन्हा पुन्हा पाहण्याची सवय असते. सूचना तपासणे ही एक सवय बनते. यामुळे झोप खराब होते. काही लोक रात्री फोन वापरतात त्यामुळे झोप न येण्याची समस्या निर्माण होते.


नवीन वर्षात करा हा एक संकल्प, सर्व आजारांपासून राहाल लांब