बातम्या

राजेश क्षीरसागरची मस्ती चालणार नाही - अंबादास दानवे

Rajesh Kshirsagar s fun will not work


By nisha patil - 8/2/2024 4:42:08 PM
Share This News:



काही दिवसांपूर्वी राजेंद्र वरपे यांनी मारहाण प्रकरणी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष  राजेश क्षीरसागर यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती. ही तक्रार दाखल करून कित्येक दिवस झाले तरी अद्याप  क्षीरसागर यांच्यावर गुन्हा दाखल झालेला नाही.  राजेंद्र वरपे यांनी आज विधानपरिषदेतील  विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्या कोल्हापूरातील जनता दरबारात याबाबत दाद मागितली.

 तेव्हा विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांना फोन करून ,” राजेंद्र वरपे यांच्या तक्रारीनुसार राजेश क्षीरसागर यांच्यावरती गुन्हा दाखल का झाला नाही ?,  गुन्हा रजिस्टर का नाही ? लगेच कारवाई झाली पाहिजे, पोलिसांची आणि क्षीरसागरची मस्ती चालणार नाही, अशा कठोर शब्दांत  पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांना चांगलंच खडसावलंय.   
  आता त्यामुळे राजेश क्षीरसागर यांच्यावर गुन्हा दाखल होतो काय हे आता पहावे लागणार आहे. यावर पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी, शहर डी वाय एस पी अजित टिके यांना तात्काळ जनता दरबाराच्या ठिकाणी  पाठवून दिलं. विरोधी पक्षनेते  दानवे यांनी टिके यांना राजेंद्र वरपे यांच्या तक्रारी नुसार तात्काळ गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या.


राजेश क्षीरसागरची मस्ती चालणार नाही - अंबादास दानवे