बातम्या

जिल्यात नियमित पाणीपुरवठा ;आजपासून अंमलबजावणी

Regular water supply in the district


By nisha patil - 7/25/2023 6:45:04 PM
Share This News:



पावसाचा जोर वाढल्याने अखेर कळंबा तलावातील पाणीसाठ्यात वाढ झाली सोमवारी तलावातील पाण्याची पातळी पंधरा फुटांवर गेली त्यामुळे महापालिकेने शहरात दिवसाआड पाणीपुरवठा बंद केला असून आज मंगळवारपासून नियमित पाणीपुरवठा केला जाणार असल्याची माहिती जल अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी दिली .शिंगणापूर उपसा केंद्रास  पुराणे वेढा   दिला आहे पुढील चार दिवस ऑरेंज अलर्ट असून राधानगरी धरणी भरण्याच्या मार्गावर आहे .त्यामुळे धरणातून विसर्ग वाढविला आहे. शिंगणापूर उपसा केंद्र बंद पडण्याचा धोका आहे .असे झाल्यास पुन्हा दिवसाआड पाणीपुरवठा करावा लागणार असल्याची माहिती जल अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी दिली.


जिल्यात नियमित पाणीपुरवठा ;आजपासून अंमलबजावणी