बातम्या

महाराष्ट्राचे राजकारण संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनीच केलं खराब : चंद्रशेखर बावनकुळे

Sanjay Raut and Uddhav Thackeray have ruined the politics of Maharashtra


By nisha patil - 12/8/2024 4:55:04 PM
Share This News:



जर उद्या मतदान घेतलं तर राज्याची 14 कोटी लोकसंख्या हे ठरवेल की महाराष्ट्राचे राजकारण संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनीच खराब केलंय. अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलीय.उबाठा गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत वक्तव्य करताना अतिशय गलिच्छ शब्दाचा वापर केला आहे. निव्वळ राजकीय हेतूने त्यांनी या योजनेला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला आहे. कर्नाटक हिमाचल सारख्या राज्यांमध्ये जिथे काँग्रेसचे सरकार आहे तिथे यांनी खोटारडेपणाच केला आहे. गृहमंत्र्यासारख्या योजना जाहीर करून निवडणूक झाल्यानंतर या योजना तेव्हाच बंद केल्या. देशभरात जिथे जिथे महायुती भाजपचं सरकार आहे तिथे या योजना निरंतरपणे सुरू आहे. एकट्या मध्य प्रदेश मध्ये गेल्या दहा वर्षापासून ही योजना सुरू आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना माझे एवढेच सांगणे आहे की, लबाड काँग्रेस पार्टी सोबत सध्या तुम्ही आहात. म्हणून तुम्हाला लबाडीच दिसत आहे. अशा शब्दात उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी निशाणा साधला आहे.


महाराष्ट्राचे राजकारण संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनीच केलं खराब : चंद्रशेखर बावनकुळे