बातम्या

गोव्याहून मुंबईकडे जाणाऱ्या खाजगी ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात

Terrible accident of private travel going from Goa to Mumbai


By nisha patil - 11/23/2023 6:22:13 PM
Share This News:



 गोव्याहून मुंबईला जाणारा व्हीआर एल ट्रॅव्हल्स गुरुवारी पहाटे दोनच्या सुमारास कोल्हापूर शहराजवळ राधानगरी मार्गावर पुईखडी येथे उलटून भीषण अपघात झाला. या अपघातात पुण्यातील मांजरी बुद्रुक येथील एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. नीलू गौतम रिधिमा गौतम आणि सार्थक गौतम अशी मृतांची नावे आहेत तर चौघेजण जखमी झाले आहेत  मिळालेल्या माहितीनुसार, व्ही आर एल कंपनीची मुंबईला जाणारी खाजगी स्लीपर कोचबस बुधवारी रात्री आठ वाजता गोव्यातील पणजी येथून निघाली. गुरुवारी पहाटे दोनच्या सुमारास कोल्हापूर शहराजवळ पुईखडी येथे भरधाव बस उलटली. या अपघाताची माहिती मिळताच कोल्हापूर महानगरपालिकेचे अग्निशमन दलाचे जवान, मुख्य अग्निशमन अधिकारी आणि करवीर पोलीस घटनास्थळी पोहचले. तातडीने बचाव कार्य राबवून जखमीना उपचारांसाठी सीपीआर मध्ये पाठवले बस मध्ये एकूण 25 प्रवासी होते. त्यातील बसखाली अडकल्यामुळे तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर ४ जण गंभीर जखमी झाले. अशी माहिती अग्निशामक दलाच्या जवानांनी दिली.
   चीफ फायर ऑफिसर मनीष रणभिसे, फायरमन प्रमोद मोरे सौरव पाटील चेतन जाणवेकर, युवराज लाड, प्रभाकर खेबुडे, अमित जाधव, योगेश जाधव, संजय पाटील, यांनी बचाव कार्य राबवले


गोव्याहून मुंबईकडे जाणाऱ्या खाजगी ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात