बातम्या

घरच्यांनी हट्ट धरला आणि वैष्णवी चा बळी गेला!

The family persisted and Vaishnavi fell victim


By nisha patil - 5/4/2024 9:46:49 PM
Share This News:



कोल्हापूर : प्रतिनिधी कोल्हापूर - कोल्हापुरातील शनिवार पेठ परिसरात राहणाऱ्या वैष्णवीचे ओळखीतील तरुणाशी प्रेमसंबंध होते. या दोघांनी लग्न करावं असं वैष्णवीच्या घरच्यांचं म्हणणं होतं पण ते दोघे लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहण्यावर ठाम होते. 

वैष्णवीची आई शुभांगी आणि भाऊ श्रीधर हे तिला वारंवार लग्न कर किंवा त्या तरुणाशी संबंध तोड असं सांगत होते. मात्र वैष्णवी मित्राशी असलेले संबंध तोडत नव्हती. याच रागातून वैष्णवीची आई शुभांगी, भाऊ श्रीधर यांनी तिला बुधवारी रात्री पन्हाळा तालुक्यातील देवठाणे इथं वैष्णवीचा मामा संतोष आडसूळे याच्या घरी नेलं. या ठिकाणीही वैष्णवीची समजूत काढण्याचा प्रयत्न केला मात्र तिनं नकार दिल्यानं आई, भाऊ आणि मामानं तिला बेदम मारहाण केली या मारहाणीत वैष्णवी बेशुद्ध पडली. गुरूवारी पहाटे तिला उपचारासाठी कोल्हापुरात आणण्यात आलं. मात्र उपचारापूर्वी तिचा मृत्यू झाला. वैष्णवीच्या अंगावर मारहाणीच्या खुणा असल्यानं डॉक्टरांनी लक्ष्मीपुरी पोलिसांना याबाबतची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी शुभांगी पोवार, श्रीधर पोवार यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडं चौकशी केली . चौकशीत त्यांनी वैष्णवीला मारहाण केल्याची कबुली दिली. याप्रकरणी शुभांगी, श्रीधर आणि संतोष या तिघांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयानं तिघांना १५ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावलीय.


घरच्यांनी हट्ट धरला आणि वैष्णवी चा बळी गेला!