बातम्या

मुंबईकरांवर पाणीकपातीचे सावट

Water cut on Mumbaikars


By nisha patil - 5/26/2023 5:21:26 PM
Share This News:



तारा न्यूज वेब टीम : मुंबईकरांना पाणीपुरवठा करणार्‍या सात तलावांमधील पाणीसाठा आटू लागला असून तलावांमध्ये आजघडीला सरासरी सुमारे 15.57 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. परिणामी, मुंबई महानगरपालिकेच्या जल अभियंता विभागाची चिंता वाढू लागली आहे. त्यामुळे तलावांतील राखीव कोट्यातील पाण्याचा वापर मुंबईकरांची तहान भागविण्याचा विचार प्रशासन पातळीवर सुरू असून त्यासाठी परवानगी द्यावी, अशी विनंती मुंबई महानगरपालिकेने राज्य सरकारला केली आहे. दरम्यान, पुढील महिन्यात पाऊस, तलावांतील जलसाठ्याची स्थिती लक्षात घेऊन पाणी कपातीबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.a


मुंबईकरांवर पाणीकपातीचे सावटspeednewslive24#