बातम्या

मी काल जे बोललो ते ओघात बोलून गेलो - जितेंद्र आव्हाड

What I said yesterday went through the flow  Jitendra Awad


By nisha patil - 4/1/2024 7:36:44 PM
Share This News:



मी काल जे बोललो ते ओघात बोलून गेलो - जितेंद्र आव्हाड

शिर्डी : राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड   यांनी शिर्डीत पक्षाच्या शिबिरात प्रभू श्रीराम  मांसाहारी असल्याचं वक्तव्य केलं आणि याचे पडसाद संपूर्ण राज्यभरात उमटत असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच आज (गुरुवारी) जितेंद्र आव्हाडांनी पत्रकार परिषद घेत आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. मी कधीही इतिहासाचा विपर्यास करत नाही. इतिहासाचं विकृतीकरण करणं माझं काम नाही. पण मी काल जे बोललो ते ओघात बोलून गेलो, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत. 
 

 पुढें जितेंद्र आव्हाड बोलताना म्हणाले की, मी कधीही इतिहासाचा विपर्यास करत नाही. इतिहासाचं विकृतीकरण करणं माझं काम नाही. पण मी काल जे बोललो ते ओघात बोलून गेलो. राम, प्रभू श्रीराम, ज्याला आम्ही महाराष्ट्रात पांडुरंग हरी म्हणतो. त्या रामाबद्दल बोलताना मी म्हणालो की, ते मांसाहारी होते. हा वाद मला वाढवायचा नाही. पण जे याविरोधात उभे राहिले आहेत त्यांच्या माहितीसाठी मी सांगतो, वाल्मिकी रामायणामध्ये सहा स्कंद आहेत. त्यातील अयोध्ये स्कंदेतील 52 श्लोक 102 जो आहे तो मी वाचून दाखवत नाही, कारण मला वाद वाढवायचा नाही.", असं ते म्हणाले


मी काल जे बोललो ते ओघात बोलून गेलो - जितेंद्र आव्हाड