बातम्या

सकाळी रिकाम्या पोटी अश्वगंधा खाल्ल्यास काय होते?

What happens if you eat Ashwagandha on an empty stomach in the morning


By nisha patil - 2/9/2023 8:29:26 AM
Share This News:



१. तणाव आणि नैराश्य कमी होते
सकाळी रिकाम्या पोटी अश्वगंधाचे सेवन केल्याने कोर्टिसोलची  पातळी कमी होते, ज्यामुळे तणाव कमी होतो. मूड सुधारतो. डिप्रेशन किंवा तणावग्रस्त लोकांसाठी लाभदायक आहे.

२. थायरॉईड रुग्णांसाठी फायदेशीर
अश्वगंधा खाल्ल्याने थायरॉईडचा  स्तर नियंत्रणात राहतो. अश्वगंधा थायरॉईडमुळे होणाऱ्या समस्या दूर करते. थायरॉईडचे रुग्ण दररोज सकाळी रिकाम्या पोटी अश्वगंधाचे सेवन करू शकतात.

३. इम्युनिटी बूस्ट करा 
रोज सकाळी रिकाम्या पोटी अश्वगंधा खाल्ल्याने इम्युनिटी मजबूत होते. सर्व वयोगटातील लोक अश्वगंधाचे सेवन करू शकतात.

४. हार्ट हेल्थ सुधारते 
अश्वगंधामधील अँटिऑक्सिडेंट हृदयाला फ्री रॅडिकल्सच्या नुकसानीपासून वाचवतात. हृदयाचे आजार दूर होतात. हृदयाची सूज कमी करते. हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका कमी होतो. 

५. फर्टिलिटी वाढवा
आयुर्वेदानुसार रोज सकाळी रिकाम्या पोटी अश्वगंधाचे सेवन केल्यास प्रजनन क्षमता वाढते. यामुळे पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉन हार्मोन पातळी वाढते. शुक्राणूंची संख्या आणि गुणवत्ता देखील वाढते.

अश्वगंधा घेण्याची सर्वोत्तम वेळ कोणती?

तणाव कमी करण्यासाठी सकाळी अश्वगंधाचे सेवन करू शकता.
याशिवाय इतर समस्यांवर मात करण्यासाठी सकाळी अश्वगंधाचे सेवन करू शकता.
पण स्टॅमिना वाढवण्यासाठी रात्री अश्वगंधा दुधासोबत घेऊ शकता.


सकाळी रिकाम्या पोटी अश्वगंधा खाल्ल्यास काय होते?