बातम्या

अखेर प्रार्थानाने मुंबई का सोडली..........

Why Prathana finally left Mumbai


By nisha patil - 4/18/2024 8:11:45 PM
Share This News:



माझी तुझी रेशीमगाठ  या मालिकेतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री म्हणजे प्रार्थना बेहेरे  प्रार्थना ही कधी तिच्या आगामी प्रोजेक्ट्समुळे तर कधी तिच्या सोशल मीडियाच्या पोस्टमुळे कायमच चर्चेत असते. पण या अभिनेत्रीने नुकतच मुंबई कायमची सोडली आहे. 
 

सुलेखा तळवळकर यांच्या दिल के करीब या कार्यक्रमादरम्यान प्रार्थनाने तिच्या मुंबई सोडण्याचं कारण सांगितलं आहे. ज्या मुंबईत येण्यासाठी अनेक मंडळी धडपड करत असतात, ती मुंबई सोडण्याचा निर्णय प्रार्थनाने का घेतला हा प्रश्न तिच्या चाहत्यांना बऱ्याच दिवसांपासून पडला होता. पण आता यावर अभिनेत्रीने स्वत: खुलासा केला आहे

अभिनेत्री प्रार्थना बेहेरे ही नुकतीच अलिबागला राहण्यास गेली आहे. यामागचं कारण सांगताना प्रार्थना म्हणाली की, आमची अलिबागला जागा होती. कोविडच्या आधी आम्ही ती घेतली होती. पण कोविडच्या दरम्यान आम्ही ठरवलं की ती जागा आता डेव्हलप करायची आणि अलिबागवरुन प्रवास करणं तसं सोपं आहे. त्याचप्रमाणे आमचे तिथे घोडे, गाई, कुत्रे असं सगळं आहे. त्यामुळे माझ्या नवऱ्याला आठवड्यातले 4 दिवस तिथे जावं लागायचं.  जोपर्यंत मी मालिकेचं शुटींग करत होते, तोपर्यंत मी मुंबईतच होते. पण इथे प्रदूषण असं नाही, पण खूप गर्दी वाटायची. 

मला अलिबागला गेल्यावर तिथे खूप आवडायचं. तिथे छान हिरवळ आणि मोठी जागा आणि तिथे गेल्यावर मी तिथली होऊन जायचे.मी तिथे जाऊन पेंटीग करत, मला आवडतात त्या सगळ्या गोष्टी मी तिथे करते. त्यामुळे मला असं वाटलं की आपण इथे कायमचे राहायला येऊयात. त्यासाठी माझे सासू-सासरे पण तयार झालेत. सुरुवातीला त्याचा थोडा त्रास झाला, पण आता सवय झालीये. वर्ष होईल मी तिथे राहतेय, असा देखील खुलासा यावेळी प्रार्थानाने केला. त्यामुळे आता तिच्या चाहत्यांना तिने मुंबई का सोडली याबाबतची उत्सुकता संपली आहे. 


अखेर प्रार्थानाने मुंबई का सोडली..........