बातम्या

भाजपसोबत कदापी जाणार नाही : राजू शेट्टी

Will never go with BJP Raju Shetty


By nisha patil - 4/5/2024 5:14:23 PM
Share This News:



शिरोळ येथील शिवाजी चौकात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांची सभा संपन्न झाली. यावेळी बोलताना ते म्हणाले की,  ज्यांनी साडेसातशे शेतकऱ्यांचा जीव घेतला, महिलांवर अत्याचार केला, त्या भाजप सरकार सोबत कदापि आपण जाणार नाही. कदाचित निवडून आल्यानंतर आपण त्यांच्यासोबत असू, ही चुकीची माहिती  असून, मी भाजप सोबत जाण्याइतकी भाजपची लायकी नसल्याची टीका ‘स्वाभिमानी’चे नेते राजू शेट्टी यांनी केली. 

यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की, संसदेत शेती उत्पादनांना हमीभाव मिळण्यासाठी कायद्याची गरज असून हा कायदा मंजूर झाल्यानंतर २४ पिकांना हमीभाव मिळणार आहे. शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर मी लढाई करत आहे. भूमी अधिग्रहणाचा विषय महत्त्वाचा आहे. चुकीचा प्रचार करून मला रोखण्याचा प्रयत्न सुरू आहे. कोणी कितीही आडवा पाय मारण्याचा प्रयत्न केला तरी मी दिल्ली गाठल्याशिवाय राहणार नाही. असे ते पुढे म्हणाले आहेत.


भाजपसोबत कदापी जाणार नाही : राजू शेट्टी