बातम्या

जीवन बदलुन टाकणारे स्वामी समर्थ महाराजांचे उपदेश

amarth Maharajs life changing sermons


By nisha patil - 3/9/2023 7:02:23 AM
Share This News:



उगाची भितोसी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे,
जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा” 

“यशस्वी होण्याचा एकच उत्तम पर्याय आहे, दुसऱ्याच भल झालेले पाहण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे.” “जो असे कारण सर्व सृष्टीशी अकारणे जो लावी भक्तीसी भुलवी मनाच्या दंभ युक्तीसी असा अविनाशी स्वामी माझा” 

“विश्वास ठेव जिथे संपते मर्यादा तुझी, तिथून साथ देतो मी”
“जाणीव ठेव शुद्ध मनासी काय व्यर्थ बरळतो कशाची असो भूक त्यासी? तू पुढे काय ठेवितो”

“तुझ्या अंतरात्म्यात आहे मी तुला हरू देणार नाही, या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही, जी झुंझ तू खेळतो आहेस मनासी त्यात तुला मार्ग दाखवत असणार मी. भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.”
“भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे”

“कोणत्याही साकारात्मात विचारांना कोणतेही विष मारू शकत नाही आणि कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचवू शकत नाही.


जीवन बदलुन टाकणारे स्वामी समर्थ महाराजांचे उपदेश