बातम्या

आ. जयश्री चंद्रकांत जाधव

come Jayashree Chandrakant Jadhav


By nisha patil - 4/6/2024 10:23:37 PM
Share This News:



कोल्हापूर : प्रतिनिधी कोल्हापूरची अस्मिता व कोल्हापूरचा स्वाभिमान राजर्षी छ्त्रपती शाहू महाराजांचे वारसदार श्री. शाहू छत्रपती महाराज यांना कोल्हापूरकरांनी सन्मानाने लोकसभेत पाठवले, याचा मोठा आनंद आहे. संविधान वाचवण्यासाठी, एकाधिकारशाही मोडीत काढण्यासाठी आणि समतेचा विचार कायम राखण्यासाठी कोल्हापूरची जनता शाहू महाराजांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिली. यामुळे खऱ्या अर्थाने कोल्हापूरचा आवाज संसदेत पोचला आहे. कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासासाठी शाहू महाराजांच्या मार्गदर्शनाखाली सदैव कार्यरत राहू. जनतेने आज दिलेला कौल यापुढेही कायम राहील आणि राज्याच्या व देशाच्या राजकारणाला दिशा देणारा ठरेल याचा मला विश्वास आहे.


आ. जयश्री चंद्रकांत जाधव