बातम्या

कोल्हापुरात दारात चूल पेटवली गेली म्हणून मारहाण

setting fire to the hearth at the door


By nisha patil - 12/1/2024 2:43:46 PM
Share This News:



कोल्हापूर : घरात भाडेकरून म्हणून ठेवलेल्या कुटुंबियांनी आंघोळीचे पाणी तापवण्यासाठी चूल पेटवल्यानंतर झालेल्या धुरावरून दोन शेजाऱ्यांमध्ये शिवीगाळ व मारामारी झाली. दोन्ही कुटुंबियांनी परस्पर विरोधात करवीर पोलीसात फिर्याद दिली आहे. मारामारीची घटना बुधवारी सकाळी साडेसातच्या सुमारास घडली.

वृषाली श्रीनिवास माळवदे (वय ५२) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शेजारी राहाणारे प्रशांत साखळकर यांच्या घरातील भाडेकरूने चूल पेटवून धूर केला. हा धूर कमी करा, असे सांगण्यासाठी गेल्यानंतर साखळकर दाम्पत्याने मारहाण केल्याची फिर्याद त्यांनी दिली आहे.

त्यानुसार प्रशांत साखळकर आणि कोमल साखळकर (दोघे रा. फुलेवाडी रिंगरोड, कोल्हापूर) यांच्यावर करवीर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत प्रशांत साखळकर यांनीही फिर्याद दिली असून, श्रीनिवास माळवदे, वृषाली माळवदे, मयुरेश माळवदे आणि शामल पिसे यांच्यावर गुन्हा दाखल झाला.


कोल्हापुरात दारात चूल पेटवली गेली म्हणून मारहाण