बातम्या

मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान मोदींचे अभिनंदन, अर्थसंकल्पाने मध्यमवर्गास दिलासा दिला

Chief Minister congratulated PM Modi


By nisha patil - 1/2/2025 4:27:04 PM
Share This News:



मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान मोदींचे अभिनंदन, अर्थसंकल्पाने मध्यमवर्गास दिलासा दिला

मुंबई, १: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया व्यक्त करत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अभिनंदन केले. हा अर्थसंकल्प ग्रामीण भारताचा चेहरा बदलणारा आणि सर्वसमावेशक आहे, असे त्यांनी सांगितले. १२ लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करून मध्यमवर्गाला दिलासा देण्यात आला आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, या अर्थसंकल्पामुळे महाराष्ट्राच्या महत्वाकांक्षी धोरणांना बळ मिळेल. स्टार्टअप्स, कृषी क्षेत्र, पायाभूत सुविधांसाठी नवीन योजनांचा लाभ महाराष्ट्राला होईल. विशेषत: कृषी क्षेत्रासाठी १०० जिल्ह्यांसाठी योजना, शंभर टक्के माल खरेदी धोरण आणि मच्छिमारांसाठी कर्ज सुविधा दिली जाणार आहे.

युवक आणि उद्योजकांसाठी महत्वाचे निर्णय घेतले गेले आहेत, जसे की स्टार्टअपसाठी कर्ज मर्यादा वाढवणे. पायाभूत प्रकल्पांसाठी ५० वर्षे बिनव्याजी कर्जाची योजना राज्यांना उपलब्ध होईल.

अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी विविध प्रकल्पांसाठी तरतुदी करण्यात आल्या आहेत, ज्यामुळे राज्याच्या आर्थिक वृद्धीला चालना मिळेल.


मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान मोदींचे अभिनंदन, अर्थसंकल्पाने मध्यमवर्गास दिलासा दिला
Total Views: 53