बातम्या

राजाराम तलाव परिसरात ‘ऋतूसंकल्प’: एकाच दिवशी दोन हजार झाडे लावून नवा रेकॉर्ड

Rutusanklp


By nisha patil - 11/8/2024 6:44:45 PM
Share This News:



कोल्हापूरच्या राजाराम तलाव परिसरात ‘माय ट्री, माय कोल्हापूर’ उपक्रमांतर्गत एकाच दिवशी दोन हजार झाडे लावून पर्यावरण रक्षणाच्या दिशेने मोठा पाऊल टाकण्यात आला. आमदार ऋतुराज संजय पाटील यांच्या संकल्पनेतून आयोजित या ‘ऋतूसंकल्प’ उपक्रमास तरुणाई, वृक्षप्रेमी, महिला व ज्येष्ठ नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. झाडांची योग्य निगा राखण्यासाठी पाणी पुरवठा व अन्य मदतीसाठी उजळाईवाडी ग्रामपंचायतीने सहकार्य केले. आमदार पाटील यांनी पर्यावरण रक्षणाचे महत्व सांगून, झाडे लावण्याचा संकल्प करण्याचे आवाहन केले.

आमदार पाटील आणि उपस्थितांनी पर्यावरण रक्षणाची शपथ घेतली. युवती आणि महिलांनीही या उपक्रमात महत्त्वपूर्ण सहभाग नोंदवला.


राजाराम तलाव परिसरात ‘ऋतूसंकल्प’: एकाच दिवशी दोन हजार झाडे लावून नवा रेकॉर्ड