बातम्या

संजय राऊतांचं मोठं वक्तव्य

Sanjay rautaa


By nisha patil - 7/31/2024 4:37:11 PM
Share This News:



संजय राऊतांचं मोठं वक्तव्य,


महाराष्ट्रात जोपर्यंत देवेंद्र फडणवीस आहेत, तोपर्यंत मराठी माणसाला सुख आणि शांतता लाभणार नाही


महाराष्ट्रात जोपर्यंत देवेंद्र फडणवीस  आहेत, तोपर्यंत मराठी माणसाला सुख आणि शांतता लाभणार नाही, असं मोठं वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत  यांनी केलं. राज्यात सत्तांतर घडवावं लागेल असेही राऊत म्हणाले. तसेच सत्तेचा गैरवापर करणाऱ्यांवर ताबडतोब खटले दाखल करावे असेही राऊत म्हणाले. काही मराठा आंदोलकांनी मातोश्रीवर जाऊन आंदोलन करण्याचा प्रयत्न केला, याबाबत राऊतांना प्रश्न विचारला होता. यावर बोलताना राऊत म्हणाले की,  ही सगळी भाजपची कारस्थानं आहेत. मनोज रांगे हे अजून राजकारणात आले नाहीत ते संघर्ष करत असून या देशात लोकशाही आहे कोणीही निवडणूक लढवू शकतो म्हणून मनोज जरांगे  यांना निवडणूक लढवण्याचा पूर्ण अधिकार आहे असेही ते म्हणाले


संजय राऊतांचं मोठं वक्तव्य