बातम्या

टोळ्या फडणवीसांच्या पक्षाचा सुपडा साफ करणार ....

The gangs will clean up Fadnavis's party


By nisha patil - 7/8/2024 2:46:11 PM
Share This News:



मराठा आरक्षणासाठी  लढा देणारे मराठा नेते मनोज जरांगे पाटील  यांची शांतता रॅली प्रत्येक जिल्यात  होत आहे.यातच आता सुट्टी नाही, मराठा समाजाला आम्ही आरक्षण  घेऊनच राहणार आहे. 50 टक्क्यांच्या आतच ओबीसीतूनच आरक्षण घेणार आहे. 50 टक्क्यांच्या वर बोलायचं नाही, असे मत मनोज जरांगे पाटील  यांनी व्यक्त केले. भाजपनं माझ्या मागं टोळ्या लावल्या आहेत. पण या टोळ्या देवेंद्र फडणवीसांच्या  पक्षाचा सुफडा साफ करतील असे जरांगे पाटील म्हणाले. भाजपमधील मराठा खवळला आहे. त्यांच्यामध्ये  मोठी खदखद असल्याचे जरांगे पाटील म्हणाले. 
           

आम्ही सरकारला वेळोवेळी सांगत आहे की, आम्हाला राजकारणाकडे जायचं नाही. तुम्ही आम्हाला समजून घ्या असे जरांगे पाटील म्हणाले. राज्यात जेवढे राजकीय पक्ष आहेत, त्यांनी सांगायला पाहिजे की मराठ्यांचे ओबीसीतील आरक्षण द्यायला पाहिजे असे जरांगे पाटील म्हणाले.  तुमच्याकडे सत्ता आहे, बहुमत आहे, तुम्ही आरक्षण द्या असे जरांगे म्हणाले.


टोळ्या फडणवीसांच्या पक्षाचा सुपडा साफ करणार ....