बातम्या

पाणी पिणे प्रमाण वाढवा.....

Increase water intake


By nisha patil - 5/7/2024 7:19:34 AM
Share This News:



पाण्याचे  महत्व...
*१) शरीराचा ७०% भाग पाण्याने बनलेला आहे.
*२)  दिवसभरात ३ ते ४ लिटर पाणी पिणे आवश्यक आहे.
*३)  कोमट पाणी पिणे फायद्याचे आहे.
*४)  सकाळी अनोशापोटी एक ते दोन ग्लास  कोमट पाणी पिणे अमृता समान आहे.  
*५)  रक्ताभिसरण व्यवस्थित होते.     
*६)  B. P.  संतुलित राहतो.
*७)  बद्धकोष्ठता नष्ट होते.
*८)  आळसपणा कमी होतो.
*९)  डोक्यावरील केस गळत नाहीत.
*१०)  स्किनचे प्राँब्लेम्स होत नाहीत.
*११)  तारूण्य टिकून राहते
"१२)  शरीर आतून स्वच्छ होते.
*१३)  किडनी स्टोन होत नाहीत.
*१४)  अन्नपचन चांगले होते.
*१५)  मेंदूला योग्य प्रकारे रक्त पूरवठा होतो.
*१६)  जेवणापूर्वी आर्धा तास आधी पाणी प्यायल्यास शरीर बारीक होते.
*१७)  जेवणानंतर लगेच पाणी जास्त प्यायल्यास शरीर जाड होते. पोट सुद्धा वाढते. पचन व्यवस्थित होत नाही. जेवणानंतर एका तासाने पाणी प्यावे.
*१८)  जेवणामध्ये एक ते दोन घोट पाणी  प्यायल्यास शरीर मध्यम राहते.
*१९)  जेवणानंतर एका तासांनी आवश्य तेवढे पाणी प्यावे.
*२०)  आपण  गरम / मध्यम  गरम  जेवण  घेतो. म्हणून जेवतेवेळी कोमटच पाणी पिणे  आवश्यक आहे. अन्यथा पचनशक्ती कमजोर  होईल. फ्रिजचे पाणी / बर्फाचे थंड पाणी  केव्हाच पिऊ नका. तर माठातील प्या.
*२१)  तहान  लागली  की  पाणी  प्यावेच.  
*२२)  जास्तच  तहान  लागली  की  मात्र  गुळ  पाणी  प्यावे.
*२३)  क्षारयुक्त पाणी शरीराला घातक आहे. ते चेक करून  घ्या. अन्यथा आजार  होतील.
*२४)  आजारपणात  गरम  पाणी  प्यावे.  
*२५)  रात्री  जास्त  पाणी  पिऊ  नये.
*२६)  पाणी नेहमी बसूनच प्यावे. अन्यथा  उतार  वयात गुढघे दुखीचा त्रास नक्कीच होईल.
*२७)  पाणी चवीचवीने म्हणजेच तोंडात  जास्तवेळ फिरवून पिणे. त्यामुळे पाण्यात  लाळ मिसळून ती पोटात जाते आणि  रोगप्रतिकारकशक्ती वाढते.
*२८) जेवढी तहान तेवढेच पाणी प्यावे. जास्त प्रमाणात पाणी प्यायल्यास पचनशक्ती कमजोर होते. अधिक ऊर्जा खर्च होते. तसेच किडनीलासुद्धा त्रास होऊ शकतो.

 


पाणी पिणे प्रमाण वाढवा.....