बातम्या

कोल्हापुरातील वाहतूक समस्येवर तोडगा – ६२४ कोटींच्या प्रकल्पाला तत्त्वत: मान्यता

Solution to traffic problem in Kolhapur


By nisha patil - 2/18/2025 8:27:13 AM
Share This News:



कोल्हापुरातील वाहतूक समस्येवर तोडगा – ६२४ कोटींच्या प्रकल्पाला तत्त्वत: मान्यता

कोल्हापूर, १७ फेब्रुवारी: केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग विकास कामांचा आढावा घेतला. शहरातील वाहतूक समस्येच्या सोडवणुकीसाठी फ्लायओव्हर व बास्केट ब्रिजसह ६२४ कोटी रुपयांच्या प्रकल्पाला तत्त्वत: मंजुरी देण्यात आली आहे.

प्रमुख निर्णय:

  • शिवाजी पूल ते तावडे हॉटेल (६.८ किमी) उड्डाणपुलासाठी मंजुरी
  • यावळुज ते शिवाजी पूल (१०.८ किमी) रस्त्याचे रुंदीकरण व पुरस्थितीवर उपाय
  • गगनबावडा-रत्नागिरी मार्गावर २ किमी जोड रस्ता प्रस्तावित
  • सातारा-कागल रस्ता डिसेंबर २०२५ पूर्वी पूर्ण करणार
  • आंबा-पैजारवाडी व पैजारवाडी-चोकाक मार्ग एप्रिल २०२६ अखेर पूर्ण होणार

बैठकीत खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, जिल्हाधिकारी अमोल येडगे, तसेच राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प संचालक संजय कदम यांसह विविध अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. गडहिंग्लज व आजरा शहरासाठी रिंगरोडच्या मागणीवरही लवकरच निर्णय होणार असल्याचे सांगण्यात आले.


कोल्हापुरातील वाहतूक समस्येवर तोडगा – ६२४ कोटींच्या प्रकल्पाला तत्त्वत: मान्यता
Total Views: 45