बातम्या
राज्यातील कारागृह घोटाळा: ५०० कोटींचा गैरव्यवहार – राजू शेट्टी
By nisha patil - 6/3/2025 7:18:49 PM
Share This News:
राज्यातील कारागृह घोटाळा: ५०० कोटींचा गैरव्यवहार – राजू शेट्टी
पुणे, ६ मार्च २०२५: राज्यातील कारागृहांमध्ये २०२३ ते २०२६ दरम्यान रेशन, कॅंटीन आणि विद्युत उपकरणांच्या खरेदीत ५०० कोटी रुपयांपेक्षा जास्त घोटाळा झाल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केला आहे.
शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, कायद्याच्या उल्लंघनाने आणि अधिकाऱ्यांच्या संगनमताने बाजारभावाच्या तुलनेत साहित्य महाग दराने खरेदी केले जात आहे. गहू, तांदूळ, डाळी, तेल, दूध आणि चिकन-मटण यांसह विविध वस्तू बाजारभावापेक्षा ३० ते २५० रुपयांनी अधिक किमतीत विकत घेतल्या गेल्या. याशिवाय, जनरेटर, वॉशिंग मशीन, ड्रोन कॅमेरे, प्रिंटर, कुलर यांसारख्या उपकरणांच्या खरेदीतही मोठा गैरव्यवहार आढळला.
शेट्टी यांनी तत्कालीन अप्पर पोलिस महासंचालक अमिताभ गुप्ता आणि पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांच्यावर चौकशीची मागणी केली आहे. तसेच, कारागृहातील अन्न निकृष्ट असल्याचे अनुभव येरवडा कारागृहात असताना घेतल्याचेही त्यांनी सांगितले. या घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी होऊन जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.
राज्यातील कारागृह घोटाळा: ५०० कोटींचा गैरव्यवहार – राजू शेट्टी
|